सातारा जिल्ह्यातील धरणे || Dams in Satara District in Marathi
सातारा जिल्हा म्हणजे धरणांच्या बाबतीत खूप महत्वाचा प्रदेश! एकूण 28 धरणे असलेल्या या सातारा जिल्ह्यामध्ये 8 महत्वाची धरणे आहेत. आज आपण या सर्व 28 धरणांविषयी थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
सातारा जिल्हयाविषयी माहिती
List of Dams in Satara District in Marathi
1) कोयना धरण
2) यरळवाडी धरण
4) म्हसवड धरण/ राजेवाडी धरण
5) वीर धरण
6) तारळी धरण
7) कण्हेर धरण
8) धोम धरण
9) वेण्णा धरण / तलाव
10) बलकवडी धरण
11) पांगारे धरण
12) जिमनवाडी धरण
13) थोसेघर लेक
14) पलसवडे धरण
15) मांडवे निनाम धरण
16) कुसवडे धरण
17) मापरवाडी धरण
18) कावडी धरण
19) महू धरण
20) कास तलाव
21) नागेवाडी धरण
22) येवती धरण
23) उत्तरमांड धरण
24) आंधळी / आंधरवाडी धरण
25) मराठवाडी धरण
26) महिंद्र धरण
27) तुळशीवृंदावन धरण
28) ड्रॅगन लेक रामानंद
29) उरमोडी धरण
काही महत्वाच्या धरणांची सविस्तर माहिती-
1) कोयना धरण
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणजेच कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. भारतात सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारे जे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यांच्या यादीमध्ये कोयना धरण जलविद्युत प्रकल्प हा 2ऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. कृष्णा नदीची उपनदी असणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाच्या बांधकामाला सुरुवात ही 1956 मध्ये झाली तर हे बांधकाम 1964 साली पूर्ण झाले. धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजेच 339 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 807.2 मीटर म्हणजेच 2648 फूट इतकी आहे. कोयना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 105 टीएमसी म्हणजे 105000 दशलक्ष घनफुट आहे. कोयना धरणावर 20 मेगावॅटचे 2, 70 मेगावॅटचे 4 तर 75 मेगावॅटचे 4, 80 मेगावॅटचे 4, 250 मेगावॅटचे 4 टर्बाईन बसवलेले आहेत. एकूण वीजनिर्मिती ही 1960 मेगावॅट इतकी केली जाते. भारतातील सध्याचा सर्वात मोठा पहिल्या क्रमांकाचा जलविद्युत निर्मित प्रकल्प हा कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तेहेरी जलविद्युत प्रकल्प काम पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर पहिला मोठा प्रकल्प असेल आणि कोयना तेव्हा दुसऱ्या स्थानावर जाईल.
2) यरळवाडी धरण
खटाव तालुक्यात यरळवाडी गावाजवळ हे धरण आहे. खटाव या तालुक्याच्या ठिकाणापासून धरण 25 किलोमीटर अंतरावर तर सातारा शहरापासून 62 किलोमीटर अंतरावर आहे. धरणाचे बांधकाम हे येराळा नदीवर केलेले आहे. ही नदी कृष्णा माईची उपनदी आहे. धरणाचे बांधकाम हे 1972 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 19.5 मीटर म्हणजेच 63 फूट इतकी आहे. येरळवाडी धरणाची लांबी ही 2115 मीटर म्हणजे 6938 फूट आहे. येरळवाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 1.17 टीएमसी म्हणजेच 1170 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
3) मोर्णा गुऱ्हेघर धरण
धरण पाटण तालुक्यातील पाटण या गावाच्या जवळच आहे. हे धरण पाटण या शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा शहरापासून हे धरण 71 किलोमीटर अंतरावर आहे. मोर्णा नदीवर बांधलेले हे धरण असून मोर्णा कोयनेची तर कोयना कृष्णा माईची उपनदी आहे. मोर्णा गुऱ्हेघर धरणाचे बांधकाम हे 2006 साली पूर्ण झाले. मोर्णा गुऱ्हेघर या धरणाची उंची ही 154 फूट म्हणजेच 47 मीटर इतकी आहे. तर धरणाची लांबी ही 1380 फूट म्हणजेच 420 मीटर इतकी आहे.धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 1.4 टीएमसी म्हणजे 1400 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
4) म्हसवड धरण / राजेवाडी धरण
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडी गावाजवळ वसलेले हे धरण शेतीसाठी जणू वरदानच आहे. म्हसवड हे धरण म्हसवड शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर तर सातारा शहरापासून 103 किलोमीटर अंतरावर आहे. म्हसवड हे धरण माणगंगा नदीवर बांधलेले आहे. माणगंगा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. म्हसवड धरणाचे बांधकाम हे 1887 साली झाले. धरणाची उंची 24 मीटर म्हणजे 79 फूट आहे. धरणाची लांबी ही 2473 मीटर म्हणजेच 8114 फूट इतकी आहे. म्हसवड धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 1.69 टीएमसी म्हणजे 1690 दशलक्ष घनफुट आहे.
5) वीर धरण
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या शिरवळ गावाच्या जवळ वीर धरण आहे. वीर हे धरण पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. खंडाळा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आपल्याला वीर धरण आहे. सातारा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. वीर धरणाची बांधणी ही नीरा नदीवर केलेली असून त्याचे बांधकाम हे 1965 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 35.81 मीटर म्हणजेच 117 फूट इतकी आहे तर धरणाची लांबी ही 3629 मीटर म्हणजेच 11906 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10.15 टीएमसी म्हणजेच 10150 दशलक्ष घनफुट इतकी आहे. वीर धरणाच्या पाण्याचा वापर हा वीजनिर्मिती साठी केला जातो. इथे 9 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प आहे. कालव्यांच्या मदतीने शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. धरणाच्या पाण्याचा वापर हा पुणे आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांसाठी होत असल्याने धरणाचा समावेश दोन्ही जिल्ह्यांच्या धरणाच्या यादीत होतो.
6) तारळी धरण
पाटण तालुक्यातील मुरुड गावाच्या नजीक असलेले गे धरण पाटण शहरापासून 37 किलोमीटर अंतरावर तर सातारा शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. तारळी नदीवर हे धरण बांधलेले असून ही नदी कृष्णा माईची उपनदी आहे. धरणाचे बांधकाम हे 2007 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 73.41 मीटर म्हणजे 240 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 1096 मीटर म्हणजेच 3595 फूट इतकी आहे. तारळी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10 टीएमसी म्हणजेच 10000 दशलक्ष घनफुट इतकी आहे. तारळी धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.
7) कण्हेर धरण
सातारा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर तर पुणे शहरापासून 114 किलोमीटर अंतरावर कण्हेर धरण आहे. कृष्णा माईची उपनदी असलेल्या वेण्णा नदीवर कण्हेर हे धरण बांधलेले आहे. कण्हेर धरणाचे बांधकाम हे 1986 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 50.34 मीटर म्हणजेच 165 फूट इतकी आहे. तर धरणाची लांबी ही 1954 मीटर म्हणजेच 6411 फूट इतकी आहे. कण्हेर या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10.1 टीएमसी म्हणजे 10100 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 4 दरवाजे आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या भागात कास पठार प्रसिद्ध आहे. डाव्या कालव्याच्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी केला जातो.
8) धोम धरण
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या धोम गावाजवळ हे धरण आहे. वाई शहरापासून 16 किलोमीटर तर सातारा शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. धोम धरणाचे बांधकाम हे कृष्णा नदीवर केलेले आहे. 1977 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण आहेत त्यांच्या यादीत धोम धरण हे 17 व्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची उंची ही 50 मीटर म्हणजेच 160 फूट तर लांबी ही 2478 मीटर म्हणजे 8130 फूट इतकी आहे. धोम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 13.5 दशलक्ष टीएमसी म्हणजेच 13500 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरण परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत, थोड्या अंतरावर मांढर देवी, पाचगणी आणि महाबळेश्वर सारखी पर्यटनस्थळे आहेत.