अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती - Ahemednagar District Information in Marathi
Ahmednagar District Information in Marathi. सहकारतुन ग्रामोद्धार आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर जिल्हा! शब्दातील एकाही अक्षरावर काना मात्रा वेलांटी उकार काहीही नसलेला हा अनोखा जिल्हा…
अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical information about Ahmednagar District in Marathi
पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी बसलेला हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. या जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 17048 चौ. कि. मी इतके आहे. या जिल्ह्यात एकूण 14 तालुके असून अहमदनगर जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 45 लाख इतकी आहे. अहमदनगर जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. ज्वालामुखीच्या लावारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा भूस्तर तयार झालेला असून तो दख्खन टापू या नावाने ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहे. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. याशिवाय हरिश्चंद्रगड रतनगड, कुलंगगड जिल्ह्यातील काही महत्वाची शिखरे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील नद्या - Rivers in Ahmednagar District
अहमदनगर जिल्ह्यातील काही वाहणार या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यामध्ये प्रवरानदी, मुळानदी , गोदावरी नदी ,सीना नदी आणि धोरा.
प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रवरा नदीचे पाणी खूप उंचावरून पडल्यामुळे येथे रंधा धबधबा तयार होतो.
अहमदनगर जिल्ह्यातील धरणे (Dams in Ahmednagar District)
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नद्यांवर धरणे बांधलेली आहेत. त्यातील प्रवरा नदीवरील अकोले तालुक्यात बांधलेले भंडारदरा धरण हे 11 टीएमसी क्षमतेचे असून त्याचा फायदा संपूर्ण नगर जिल्ह्याला होत असतो. हरिश्चंद्रगडावर उगम पावणाऱ्या मुळा नदीवर बारागाव नांदूर येथे मुळा धरण बांधण्यात आले असून याची क्षमता ही 24 टीएमसी इतकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धरणांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples from Ahmednagar District
अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ! हे शहरामध्ये माळीवाडा येथे स्थित आहे. येथील गणपतीची उंची सुमारे अकरा फूट इतकी आहे. याशिवाय श्री साईबाबांची शिर्डी अहमदनगर शहरापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर आहे. अवतार मेहेर बाबांचे मेहेराबाद हे जगातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. ते अहमदनगर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान (श्री क्षेत्र नेवासा) , हे क्षेत्र शहरापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर आहे. जिथे माऊलीने इ.स.1290 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. या मंदिरामध्ये माऊलींच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली तो खांब आजही तेथे उभा आहे.
आणखी अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे जागतिक क्षेत्र श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर, अहमदनगर शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.
प्रवरा नदी तिरी बसलेले श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर. हे ठिकाण शहरापासून सुमारे 67 किलोमीटर अंतरावर आहे. हजारो भक्तांचे श्रद्धास्थान श्री भगवानगड हे पाथर्डी मध्ये असून अहमदनगर शहरापासून सुमारे 82 किलोमीटर अंतरावर आहे.
पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे नऊ किलोमीटर अंतरावर असणारे पुण्य पावन श्री क्षेत्र मोहटादेवी गड हे मंदिर श्री यंत्राच्या आकारांमध्ये बनविलेले आहे येथील देवता श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी आहे. याच तालुक्यात श्री क्षेत्र मढी येथे नवनाथांपैकी कानिफनाथांचे समाधिस्थान आहे. ते अहमदनगर पाथर्डी कडे जाताना सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे. श्री क्षेत्र सिद्धटेक.... अष्टविनायकांमधील सिद्धिविनायकाचे सिद्धटेक कर्जत तालुक्यामध्ये असून अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर किती अंतरावर आहे .सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे .याशिवाय जामखेड तालुक्यामधील चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे स्मारक आहे हे गाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान आहे .आनंदधाम अहमदनगर शहरांमध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेले आहे .श्री आचार्य आनंद ऋषीजी महाराज हे एक जैन संत होते. त्यांनी स्वतःला अध्यात्मिक उपक्रमातील जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून आत्मसात केले .1962 साली त्यांना आचार्य हे नाव देण्यात आले आणि 1992 मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. अहमदनगर शहरापासून सुमारे 130किलोमीटर अंतरावर श्री मिरवली बाबांचा पहाड आहे हे हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे. तिथून जवळच सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र अगडगाव आहे. तिथे श्री काळभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. येथील श्री काळभैरवनाथ नवसाला पावतात असे येथील भक्त सांगतात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन वास्तू आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात .पारनेर तालुक्यातील शिवमंदिर पारनेर पासून जवळ जवळ दीड किलोमीटर अंतरावर शंकराचे बाराव्या शतकातील दोन मंदिरे आहेत .याशिवाय याच तालुक्यात पाच दगडांचे दरवाजे ,निजामशाहीच्या काळात बांधलेली मोठ्या तटबंदीचे दरवाजे असलेली वास्तू आहे. टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर लेणी .लेणी आठव्या शतकातील आहे. नेवासे तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित काळेगाव टोका येथील तीन मंदिरे असलेला एक समूह आहे. येथे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. याशिवाय देवी मंदिर आणि विष्णू मंदिर देखील आहे. हे ते नदीवर असलेल्या प्रशस्त घाट मंदिराभोवती आहे .शेवगाव तालुक्यातील घोटाळा येथील जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर. ही मंदिरे बाराव्या ते चौदाव्या शतकात बांधलेले आहेत .या मंदिरांची पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली गेली. कर्जत तालुक्यातील मल्लिकार्जुन मंदिर हे मंदिर तेराव्या चौदाव्या शतकात बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे .राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावांमधील हेमाडपंती ब्राह्मणी मंदिर, या मंदिराचा परिसर सुंदर आहे. हे मंदिर बाराव्या- तेराव्या शतकातील आहे. भवानी मंदिर तहकारी तालुका अकोले भवानी मंदिर यादव साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले .होते या पवित्र ठिकाणी महालक्ष्मी आणि भैरवी यांची प्रतिमा आहे .याच तालुक्यातील रतनवाडी गावांमधील अमृतेश्वर मंदिर .हे मंदिर बाराव्या -तेराव्या शतकातली आहे .बाळेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर पेडगाव तालुका श्रीगोंदा बाळेश्वर हे मंदिर महादेव शंकराला समर्पित केलेले आहे. सध्या हे मंदिर शिखर नसलेल्या पण खांबांनी भेटलेल्या अवस्थेत आहे. कात्राबाद देवी मांडगाव तालुका श्रीगोंदा हे मंदिर ते पवित्र स्थान आहे .याला तीन प्रवेशद्वार असून समोर एक द्वारमंडप आहे .कोकमठाण येथील शिवमंदिर तालुका कोपरगाव ,ते मंदिर तेराव्या शतकातील आहे .मंदिराचा वरचा भाग भौमितिक शैलीने बांधला गेलेला आहे. मंदिराच्या कळसावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणारा मुर्त्यांचे नक्षीकाम केलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Ahmednagar District
अहमदनगर जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत .त्यामध्ये भंडारदरा धरण ,निळवंडे धरण, मुळा धरण. भंडारदरा पासून ते वीस किलोमीटरवर असलेला रतनगड किल्ला भंडारदरा पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला हरिश्चंद्रगड .जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ला ,कर्जत तालुक्यातील रेहकुरी काळवीट अभयारण्य अहमदनगर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.सलाबतखान दुसरा यांची कबर म्हणजेच चांदबिबी महाल, फ़रिया बाग पॅलेस, अहमदनगर शहरांमधील भुईकोट किल्ला आणि आर्मड कॉप सेंटर हे इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा - Industrial Area of Ahmednagar District
उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा प्रगतीपथावर आहे .महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादन एकट्या नगर जिल्ह्यात केले जाते .भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सन 1950 मध्ये प्रवरानगर येथे उभारला गेला . महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी येथे स्थापन झाले असून कृषी अध्यापन व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे.