महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग ।। 36 Districts and 6 Administrative Dept of Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग ।। Maharashtra division full information in Marathi


आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र जिल्ह्यातील 6 प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागांमधील एकूण 36 जिल्हे! महाराष्ट्रात 36 जिल्ह्याचे 6 विभाग केलेले आहेत त्यांना प्रशासकीय दृष्ट्या सोयीसाठी बनवण्यात आले असल्याने त्यांना प्रशासकीय विभाग म्हणून ओळखले जाते. 

Districts and administrative dept of maharashtra

Maharashtra division full information in Marathi

महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग-

1. अमरावती

2. औरंगाबाद

3. कोकण

4. नागपूर

5. नाशिक

6. पुणे


या 6 विभागांमधील जिल्हे आता बघुयात-

अमरावती विभाग:

अमरावती विभागात एकूण 5 जिल्हे आहेत. यात अमरावती , अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश होतो.

औरंगाबाद विभाग:

औरंगाबाद विभागात एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो.

कोकण विभाग:

कोकण विभागात एकूण 7 जिल्हे येतात. यात पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.

नागपूर विभाग:

नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. यात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.

नाशिक विभाग:

नाशिक विभागात देखील 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यात नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे विभाग:

पुणे विभागात देखील 5 जिल्हे येतात. यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.


महाराष्ट्र हा 6 विभागांत आणि त्यांच्या अंतर्गत 36 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय हे त्या जिल्ह्याच्या नावाच्या शहरात वसलेले आहे. या गोष्टीला अपवाद देखील आहेत. त्या जिल्ह्यांची नावे असलेले शहरच नसल्याने त्या जिल्ह्यांची मुख्यालय हे दुसऱ्या नावाच्या शहरात आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग येथे आहे. तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय हे वांद्रे येथे आहे. 


लोकसंख्येच्या दृष्टिने विचार करता महाराष्ट्रात ठाणे हा जिल्हा सर्वात मोठा आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक हा पुणे जिल्ह्याला तर तिसरा क्रमांक हा मुंबई उपनगर चा लागतो. 

अहमदनगर जिल्हा (17048 चौरस किमी) हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या यादीमध्ये पुणे (15643 चौरस किमी) हा दुसऱ्या तर नाशिक जिल्हा (15582 चौरस किमी) हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने