आषाढी एकादशी आणि वारी संपूर्ण माहिती ।। Aashadhi Ekadashi & Wari information in Marathi

आषाढी एकादशी आणि वारी संपूर्ण माहिती ।। Aashadhi Ekadashi & Wari information in Marathi

आषाढी एकादशीचे महत्व आणि वारीची महती सर्वांसमोर आणण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न! आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी होय. आषाढ महिन्यात देखील इतर महिन्यांप्रमाणे दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी. यापैकी आषाढ शुद्ध एकादशी ही हिंदू धर्मात अगदी महत्वाची आणि पूज्य मानली जाते. या एकादशी निमित्त अनेक वारकरी हे पंढरीच्या वारीला जात असतात. ही वारी म्हणजे त्या वारकऱ्यांची आणि विठ्ठलाची भेट असते. प्रत्येक घरात या आषाढी एकादशी निमित्त उपवास देखील केला जातो. 

Aashadhi-ekadashi-wari-mahiti

महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरील देखील लोक विठ्ठलाच्या नामघोषात पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात. यालाच आषाढी वारी असे म्हणले जाते. पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केले जाते. विठ्ठलाचे मनोभावे दर्शन देखील घेतले जाते. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वदूरहून अनेक पालख्या पंढरपुरात येतात. यात पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वर हुन निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, देहू हुन तुकाराम महाराजांची पालखी तर आळंदी हुन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या पंढरपूरला येत असतात. शेगाव येथून पूर्ण ब्रम्ह अधिकारी श्री संत गजानन महाराज यांची पालखी देखील पंढरपूरला रवाना होत असते. उत्तर भारतामधून कबीरांची पालखी देखील येत असते. 

वारकरी संप्रदायात या दिवशी उपवास करण्याचे विशेष महत्व सांगितलेले आहे. प्रत्येक घरामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्व व्यक्ती या आषाढी एकादशीचा उपवास धरत असतात. 

आजच्या या आधुनिक सोशल मीडिया युगात अनेक लोक आषाढी एकादशी निमित्त इतरांना शुभेच्छा संदेश देखील देत असतात. विविध शाळा, विठठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले जाते. 

आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा संदेश 

आषाढी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा - Story of Aashadhi Ekadashi in Marathi

कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने प्रचंड तप करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. यात त्याने भगवान शंकराकडून अमर पद देखील मिळविले. अमर म्हणजे याचाच अर्थ असा की आता मृदूमान्य कधीही मरणार नव्हता. भगवान शंकराने त्याला हे वरदान देत असताना एक वर देखील दिला की तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल. त्यामुळेच ब्रम्हदेव, भगवान विष्णू आणि शंकर यांच्यापासून देखील तो अजिंक्य झाला. त्याला यांच्यापासून कोणत्याही प्रकारची भीती उरली नाही. सर्व देव यावेळी मदतीसाठी भगवान शिवशंकराकडे धावले. भगवान शंकरांनी मदतीसाठी हतबलता दाखविली. अशात सर्व देव भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजे आवळी वृक्षाच्या खाली एका गुहेत लपून बसली. 

त्यावेळी आषाढी एकादशी होती. त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नाही. आपोआपच त्यांना आषाढी एकादशीचा उपवास घडला. त्यासोबतच पावसाच्या धारेत त्यांना स्नान देखील घडले. त्यावेळी अचानक त्यांच्या एकवटलेल्या श्वासांपासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने त्या मृदूमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवतांची मुक्तता केली. ही शक्ती देवी म्हणजेच एकादशी देवता! आणि म्हणूनच एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हणले जाते. 

शैव असो किंवा वैष्णव असो या दोन्हीचे उपासक हे एकादशीचे व्रत करताना दिसतात. 

आषाढी एकादशी आणि वारी संपूर्ण माहिती ।। Aashadhi Ekadashi & Wari information in Marathi

मित्रांनो, विठ्ठलाशी संबंधित सुद्धा अनेक कथा आपल्याला याठिकाणी दिसून येतात. 

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता आणि तो वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षसांचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. गयासुर अरी ने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देवगणांना भुलविले होते. गोमातेची आणि ब्राह्मणांची हत्या सुरू केली. त्यामुळेच मनमाह मूळ जगदपित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्धय नामे अवतार धारण करून गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले. 

नंतर जो संत पुंडलिक होता त्या पुंडलिकाची भेट घेऊन त्याला स्वतःचे स्वरूप दाखवले आणि माता पित्याची सेवा केल्यामुळे त्याला मोक्ष प्रदान केला. 


13 वे ते 17 वे शतक या दरम्यान संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी विठोबाची मनोभावे भक्ती केली. या वारकरी संतांनी विठुरायाच्या स्तुतीमध्ये अनेक मराठी काव्य रचले त्यांनाच अभंग म्हणले जाते. हरिणी कानडी लोक आणि आदीशंकराचार्य यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचले. 

इतके मोठे महात्म्य असणाऱ्या या विठ्ठलाची वारी करण्यासाठी अनेक लोक या आषाढी एकादशीला आतुर होऊन त्याच्या नामघोषात आपली वाटचाल करत असतात. 

आषाढ महिन्यात म्हणजेच शक्यतो जून किंवा जुलै या इंग्रजी महिन्यामध्ये ही आषाढी एकादशी असते. आषाढ या मराठी महिन्याती शुक्ल म्हणजे शुद्ध पक्षातील 11वि तिथी म्हणजेच ही महाएकादशी आषाढी एकादशी होय. हीच एकादशी देवशयनी एकादशी या नावाने देखील ओळखली जाते. वारकरी संप्रदायात आणि हिंदू धर्मात हा एक खूप पवित्र दिवस असतो. याच दिवसापासून चतुर्मासास सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ होय! हा चार महिन्यांचा काळ आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो. असे म्हणले जाते की या चार महिन्यांच्या काळात भगवान श्रीहरी श्रीविष्णू हे क्षीरसागरात  शेषनागावर योगनिद्रिस्त होतात. चातुर्मास संपल्यानंतर म्हणजे कार्तिकी एकादशीला ते या योग्य निद्रेतून बाहेत येतात. याच कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे संबोधले जाते. या चार महिन्यांच्या काळात अनेक लोक मांसाहार सोडून देतात. 

मित्रांनो, पंढरपूरचे जे मंदिर आहे आणि त्यातील जी मूर्ती आहे ती अत्यंत पुरातन आहे. या मंदिराची अनेकवेळा पुनर्बांधणी देखील झालेली आहे. शालिवाहन वंशामध्ये एक प्रतिष्ठान नावाचा राजा होऊन गेला. या राजाने या देवळाचा इसवी सण 83 मध्ये जीर्णोद्धार केल्याचे पुरावे आहेत. तसेच इसवी सण 516 मध्ये राष्ट्रकूट घराण्याच्या काळात पंढरपूर हे अत्यंत चांगली लोकवस्ती असलेले गाव असल्याचा पुरावा सुद्धा आढळतो. इ.स. 1239 साली देवगिरीच्या यादवांनी या ठिकाणी भेट दिल्याचा देखील दावा केला जातो. 

पादुका प्रदक्षिणेची प्रथा

पादुका प्रदक्षिणेची जी काही प्रथा आज पाळली जाते ती इ.स. 1296 मध्ये सुरू झाली. 

इ.स. 1650 मध्ये हैबतबाबा यांनी आळंदीहून निघून पंढरपूरला येणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.

तुम्ही कधी पंढरपूरला गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल की पूर्वेकडे तीन दरवाजे आहेत. उत्तरेकडे तीन आहेत आणि दक्षिण व पश्चिम दिशेला एक एक दरवाजा आहे. मुख्य महाद्वार हे पूर्व दिशेला आहे. त्यातील 11 पायऱ्या आपल्याला ज्या चढून जावं लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असे नाव आहे. 


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ भगवान की जय!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने