सर्वात जास्त दुर्दैवी कोण ? || Who is Most Wretched? || Akbar Birbal Story in Marathi
अकबर बिरबल मराठी गोष्टी - Marathi Story of Akbar and Birbal
एके दिवशी बादशहा अकबर हे त्यांच्या महालात झोपलेले होते. सकाळी झाली तेव्हा बादशहा अकबराला खूप जोराची तहान लागली. ते त्यांच्या नोकरांना बोलवायला लागले परंतु त्यांनी अनेक वेळा आवाज देऊन देखील कोणी आले नाही. कारण तेव्हा तिथे कोणीही नव्हते.
तेव्हा दुसऱ्या महालात साफ सफाई करत असलेल्या एका नोकराने तो आवाज ऐकला.... परंतु तो एक साधारण सफाई कर्मचारी असल्याने त्याची बादशहा साठी पाणी घेऊन जाण्याची हिंमत होत नव्हती.
हिंमत करून अखेर तो कर्मचारी अखेर बादशहा अकबरसाठी पाणी घेऊन आला. बादशहा ने ते पाणी पिले देखील. सफाई कर्मचाऱ्याला पाणी देत असताना काही दरबारातील मंडळींनी बघितले.
दुपार झाली तेव्हा बादशहाची तब्येत ही खराब झाली. त्यांच्या पोटात दुखायला लागले. अनेक वैद्य बोलावले परंतु त्यांच्या पोटाच्या वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. तेव्हा त्या दरबारातील मंडळींनी सांगितले की "महाराज, तुम्ही त्या साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हातून पाणी पिले होते म्हणून तुम्हाला हा पोटाचा त्रास यामुळे होतो आहे. कदाचित तो खूप दुर्दैवी आहे. तुम्ही सकाळी सकाळी त्याचा चेहरा बघितला आणि त्याच्या हातून पाणी देखील पिले."
हे ऐकून बादशहा अकबराने त्या कर्मचाऱ्याला तुरुंगात टाकायची शिक्षा दिली. परंतु ही गोष्ट जेव्हा बिरबलाच्या कानावर पडली तेव्हाच त्याला रहावले गेले नाही. तो सरळ बादशहा अकबराकडे गेला. तोपर्यंत बादशहाला पोटाचा त्रास हा कमी झालेला होता. बिरबलाने विचारल्यावर महाराजांनी त्याला ती सगळी घटना सांगितली. त्यामध्ये आता बादशहाने त्या कर्मचाऱ्याला दुर्दैवी म्हणले होते.
यावर बिरबल म्हणाला की "जर मी तुम्हाला त्याहून अधिक दुर्दैवी माणसाशी भेट घडवून आणेल तर तुम्ही त्याला सोडणार का?" हे ऐकून बादशहाने बिरबलाचे ऐकले. बिरबल म्हणाला की "महाराज मला क्षमा करा. परंतु त्या साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा तर तुम्ही जास्त दुर्दैवी आहात. त्याचा चेहरा बघून तुम्हाला तर फक्त पोटात दुखायला लागले परंतु तुमचा चेहरा बघून तर त्या बिचाऱ्याला तुरुंगात शिक्षा भोगावी लागते आहे."
बिरबलाचे बोलणे ऐकून महाराजांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते हसायला लागले. त्यांनी सैनिकांना आदेश दिला की त्या साफ सफाई कर्मचाऱ्याला सोडून द्या. महाराजांनी त्याला काही भेटवस्तू देऊन त्याला सोडून दिले.
अशा प्रकारे बिरबलाने केवळ एका चूक नसलेल्या व्यक्तीला शिक्षा होण्यापासून वाचवलेच पण त्यासोबत महाराजांची असलेली अंधश्रद्धा देखील संपवली.
शिकवण - Moral of the Story
कोणाच्याही बोलण्याला ऐकुन निर्णय घेऊ नये आणि अंधश्रद्धा तर मुळीच ठेवू नये.