अंबानी स्फोटक प्रकरण । सचिन वाजे । मुंबई पोलिसांना काळीमा फासणारी घटना

अंबानी स्फोटक प्रकरण । सचिन वाजे । मुंबई पोलिसांना काळीमा फासणारी घटना


17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा असिस्टंट इन्स्पेक्टर सचिन हिंदुराव वाजे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. इतक्या वर्षानंतर 6 जुज 2020 रोजी हे 49 वर्षीय पूर्व अधिकारी परत अचानकपणे दलात भरती झाले. वाजे यांना फक्त परत आणले नाही तर त्यांना CIU म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या 20 ऑफिसर आणि 70 कॉन्स्टेबल च्या ताफ्याचा प्रमुख बनवण्यात आले. त्यांना अनेक हाय प्रोफाइल केस देखील सोपवण्यात आल्या. त्यात आहे दिलीप छाब्रिया आणि अर्णब गोस्वामी यांना अटक तसेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण इत्यादि. परंतु एक केस अशी होती ज्यात अनेक गुपिते उघडकीस आली.  

अंबानी स्फोटक प्रकरण । सचिन वाजे । मुंबई पोलिसांना काळीमा फासणारी घटना

ऑटोमोबाईल पार्टस चे डीलर मनसुख हिरेन यांचे दुकान हे पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच होते. जाहीर होते की वाजे यांची पकड त्यांच्यावर असेलच, कारण ते नियमित रूपाने आपल्या मित्राची ग्रे ग्रीन स्कॉर्पिओ उधार घेत असत. वाजे यांनी ती कारण अनेकवेळा पोलीस कार्यात देखील वापरली, जसे की नोव्हेंबर 2020 मध्ये ते रायगड पोलिसांच्या सोबत अर्णब गोस्वामी यांना अटक करायला गेले होते. तिकडे एन्काऊंटर स्पेशालिस्ट विनायक शिंदे हे तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांना तुरुंगवास हा त्यांनी एकदा व्यापारी प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्यात येऊन लखन भैय्याची बेकायदेशीर हत्या केली होती. ते आता पॅरोल वर बाहेर आले होते. आपले जुने मित्र सचिन वाजे यांना भेटण्यासाठी ते कायम दक्षिण मुंबईच्या क्रॉफोर्ड मार्केट, पोलीस मुख्यालयात चौथ्या मजल्यात त्यांच्या कार्यालयात येत असत. संभवता याच बैठकीच्या दरम्यान एक योजना आखण्यात आली. प्लॅन च्या अनुसार 17 फेब्रुवारी 2021 रोजी मनसुख हिरन हे त्यांच्या ग्रे-ग्रीन स्कॉर्पिओ मधून ठाण्यातील घराकडून दुकानाकडे निघाले. अचानक त्यांनी कार ही विक्रोळी हायवेच्या बाजूला थांबवली. स्कॉर्पिओ तिथेच सोडून त्यांनी तिथून टॅक्सी पकडली व ते तिथून निघाले. त्यानंतर ते क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या एका व्यक्तीस मिळाले आणि त्याला कारची चावी दिली.  

पुढील दिवशी मनसुख हे विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले की "माझी गाडी बंद पडली होती, मी परत जेव्हा तिला दुरुस्त करण्यासाठी आलो तेव्हा ती चोरी गेली होती." खरी गोष्ट ही होती की क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या त्या व्यक्तीने ती कार विक्रोळी हायवे वरून उचलली आणि वाजे यांच्या ठाण्याच्या घराच्या पार्किंग मध्ये लावली. NIA च्या अनुसार ती कार 17 ते 24 फेब्रुवारी दरम्यान तिथेच होती. 25 फेब्रुवारीला मध्यरात्री 2 वाजता वाजे यांचा खाजगी ड्रायव्हर हा ती गाडी घेऊन ठाण्यातून निघाला. रस्त्यात CIU ची एक इनोव्हा कार स्कॉर्पिओ सोबत चालू लागली आणि ही कार वाजे स्वतः चालवत होते. दोन्ही कार जवळपास 42 किमी च अंतर कापत दक्षिण मुंबईच्या टोनी कारमायकल रोड इथे पोहोचल्या. विशेष रूपाने अँटिलिया जवळ भारताच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्या 27 मजली घराच्या बाजूला येऊन थांबल्या. लक्षाच्या घरापासून केवळ 300 मीटर अंतरावर अडीच वाजता स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली. पीपीई किट घातलेले ड्रायव्हर स्कॉर्पिओ मधून उतरून इनोव्हा मध्ये बसले. लगेच इनोव्हा तेथून निघाली. पहाटे 3 वाजता ही इनोव्हा मुलुंड टोलनाक्यावरून ठाण्याकडे जाताना दिसली आणि परत काही वेळाने ती परत आली ती ही एक नवीन नंबर प्लेट सोबत! 2 तासानंतर वाजे परत आले, यावेळेस त्यांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. स्कॉर्पिओ मध्ये त्यांनी एक चिठ्ठी सोडली.  

सकाळ झाली आणि अँटिलिया चे सुरक्षा अधिकारी स्कॉर्पिओ ला बघताच सतर्क झाले. " या गाडीचा नंबर हा मॅडम च्या गाडीच्या नंबर सारखाच कसा आहे? " हा प्रश्न त्यांच्या समोर आला. घाबरलेल्या सेक्युरिटी ऑफिसरने पोलिसांना फोन केला. त्याने पोलिसांना सांगितले की " सर काल रात्रीपासून इथे एक गाडी उभी आहे, आम्हाला शंका आहे की काहीतरी गडबड आहे. लवकर या." ट्राफिक पोलीस सर्वात आधी तिथे पोहोचले. खिडकीची काच फोडून त्यांनी गाडी उघडली. आतमध्ये 20 जिलेटीन च्या कांड्या होत्या, त्यात कोणतेच डिटोनेटर नव्हते. डिटोनेटर शिवाय विस्फोट होत नाही. चिठ्ठी मध्ये लिहिलेले होते की ते डिटोनेटर का लावले नव्हते? त्यातील मजकूर हा असा होता की, "हे फक्त एक ट्रेलर आहे, नीता वहिनी आणि मुकेश भाऊ…. पुढील वेळेस सर्व तयारी करण्यात येईल." त्याच सोबत गाडीमध्ये अजून 5 नंबरप्लेट मिळाल्या. यांचे नंबर हे नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील इतर कार सोबत जुळत होते. त्यांना हे दाखवायचे होते की त्यांच्याकडे अंबानी कुटुंबियांची सर्व माहिती आहे. स्पष्ट होते की कार बॉम्ब हा इतका दूर होता की इमारतीला काहीच झाले नसते. पण जर योग्य वेळी स्फोट झाला असता तर तिथून जाणारी वाहने नक्की उडवता  आली असती. शेवटी मुंबई पोलीस घटनास्थळी आली, आणि आले तरी कोण? सचिन वाजे! या सर्व प्लॅन चे कथित मास्टरमाइंड! दिखाव्यासाठी ते त्यांच्या सोबत बॉम्ब स्क्वाड आणि श्वान पथक घेऊन आले. CIU च्या ऑफिसर्स ने स्कॉर्पिओ च्या मालकाचा पत्ता लावला आणि मनसुख हिरेन यांना घाटकोपर आणि विक्रोळी च्या पोलीसठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलाविले. वाजे यांनी स्वतः मनसुख यांची विचारपूस केली. त्यांच्या पत्नीच्या अनुसार , " तू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून टाक, मी काही दिवसातच प्रकरण दाबून टाकेल आणि तुला बाहेर काढून घेईल."  

नंतर जेव्हा ATS म्हणजेच अँटी टेरेरिस्ट स्क्वाड ने मनसुख यांना बोलावले तेव्हा त्यांना असे वाटले की प्रकरण हातातून निघत आहे आणि त्यामुळे त्यांनी मदतीसाठी विनंती केली. 2 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस कमिशनर यांना लिहिलेल्या पत्रात मनसुख म्हणतात की " मी पोलीस आणि मीडिया यांच्या प्रश्न मुळे त्रस्त झालो आहे, मला जाणून बुजून दोषी सिद्ध करण्यासाठी त्रस्त केले जात आहे. "  प्रकरणाने एक नवीन वळण घेतले जेव्हा 2 दिवसानंतर टेलिग्राम वर एक संदेश व्हायरल झाला, "अंबानी यांना भाजप आणि RSS ची साथ देणे महाग पडेल, आम्ही मागितलेली रक्कम दिली नाही तर परिणाम वाईट होतील. जैश-उल-हिंद"  

परंतू हा संदेश एक चाल होती, जेणेकरून हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन NIA ला दिले जाईल. कारण सर्व दहशतवादी प्रकरणामध्ये असेच केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजेवर शंका घेण्यामागे कारण होते, 2016 मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भाजपा शिवसेना युतीतील उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. तेव्हा उद्धव यांनी इच्छा बोलून दाखवली होती की सचिन वाजे यांना पोलीस दलात पुन्हा भरती करून घ्यावे. त्यांना समजवण्यासाठी काही लोक गेले आणि महाधिवक्ता यांनी सल्ला दिल्यानंतर ती मागणी त्यांनी मागे घेतली. महाधिवक्ता तेव्हा म्हणाले की वाजे यांना पोलीस दलात परत घेतल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल.  

NIA कडे रिपोर्ट जाण्याच्या आधी वाजे यांना कळून चुकले होते की त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे. त्यांनी परत एक योजना बनवली, 2004 मध्ये अशाच एका प्रकरणात ते निलंबित झाले होते. त्यावेळी ख्वाजा युनूस चा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. 51 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर ला 2002 मध्ये मुंबईच्या घाटकोपर मध्ये बेस्ट बसवर बॉम्ब हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या अनुसार ख्वाजा तुरुंगातून पळून गेला आणि त्याचा पाठलाग करत असताना तो एका दरीत पडून मरण पावला. पण अनौपचारिक कथा हे सांगते की ख्वाजा कोठडीतच मरण पावला आणि त्याचे शरीर हे दरीत फेकून देण्यात आले.  

मनसुख यांनी पत्र लिहिल्यानंतर वाजे आणि पोलीस इन्स्पेक्टर सुनील माने आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विनायक शिंदे यांनी 2 तासांची बैठक घेतली. त्यांना आता वाटायला लागले होते की मनसुख मुळे आपण फसू शकतो.

माने यांनी 4 मार्च रोजी सायंकाळी एक गुजरातचे सिमकार्ड वापरत मनसुख यांना फोन केला. " मी कांदिवली क्राईम ब्रांच मधून तावडे साहेब बोलत आहे. जर तुम्हाला या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर मला घोडबंदर रोडवर येऊन भेटा."  असे माने म्हणाले. घोडबंदर भागात ब्रिटिश काळात अरब देशातून येणारे घोडे उतरत असत. 10 वर्षांपूर्वी हा एक निर्जन रस्ता होता, एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला ठाण्याची खाडी होती. हिरेन यांना माहीत नव्हते की गुन्हेगारांना संपविण्यासाठी पोलिसांची ती मनपसंत जागा होती. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी मनसुख यांच्या महत्वपूर्ण भूमिकेला समजावून घेतले होते म्हणून त्यांनी म्हटले की मनसुख हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी, ते एक महत्वपूर्ण साक्षीदार आहेत. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. माने यांनी हिरेन यांना मदत करण्याचा बहाणा करत त्यांना घोडबंदर रोड वर हॉटेल हिल व्युवर बोलावले. तावडे साहेब त्या गाडीमध्ये तुमची वाट बघत आहेत असे बोलून माने नि त्यांना दुसऱ्या गाडीत पाठवले. तिथे मनसुख गाडीत शिरताच मागून एक क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल घेऊन एक हात पुढे आला. त्यांचे हात बांधून टाकण्यात आले व त्यांना खाडीत फेकून देण्यात आले. त्यांच्या तोंडात रुमाल ठोसण्यात आले जेणेकरून त्यांच्या शरीरात लेणी जाण्यास वेळ लागेल आणि मृतदेह वर यायला वेळ लागेल. हत्येच्या वेळी वाजे आणि माने तिथे उपस्थित होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी वाजे नि त्यांचा मोबाईल हा क्रॉफोर्ड मार्केट मधील ऑफिसमध्ये सोडून दिला होता आणि माने यांनी देखील मोबाईल कांदिवली पोलीस ठाण्यात ठेवला होता. जेणेकरून त्यांचे लोकेशन घटनास्थळापासून खूप दूर दिसेल. परंतु CCTV मध्ये ते त्यांच्या ऑफिस पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या CSMT स्टेशनजवळ चालताना दिसले. इथे त्यांनी रुमाल विकत घेतला व सेन्ट्रल लाईनची लोकल पकडत कळब्याला गेले. सर्व काही झाल्यावर ते लोकलनेच क्रॉफोर्ड मार्केटच्या ऑफिसमध्ये परत आले. त्याच रात्री 11:45 ते 1:30 च्या दरम्यान त्यांनी डोंगरी मधील एका हॉटेलवर छापा मारला. तिथे त्यांनी शून्य पंचनामा (0 FIR) दिली जी कधीच दिली जात नाही. पंचनामा हा अवैध गोष्टी सापडल्या तरच केला जातो. रात्रीमध्ये आपले ठिकाण चुकवण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न होता.  

पुढील दिवशी रात्री 10:30 च्या सुमाराला चिखलाने माखलेला मनसुख यांचा मृतदेह मिठी नदीच्या दलदलीतून काढण्यात आला. रिपब्लिक टीव्ही ने मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग प्रकाशित केली. "सचिन वाजे ने म्हंटले आहे की तो माझी स्कॉर्पिओ वापरत असल्याचे गोष्ट कोणालाच सांगू नको. " हा त्यातील महत्वाचा मुद्दा होता. मनसुख हिरेन यांच्या पत्नी कमला यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी तपास अधिकाऱ्यालाच दोषी ठरवले. त्या म्हणतात की सचिन वाजे यांनीच माझ्या पतींची हत्या केली आहे, कारण त्यांनी खोट्या आरोपाखाली अटक होण्यास नकार दिला होता.  

लवकरच वाजे यांचा इतिहास समोर आला आणि त्यांना 2004 मध्ये का निलंबित करण्यात आले याची कारणे देखील समोर आली. ते मुंबईच्या तथाकथीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट ग्रुपचे सदस्य होते. प्रदीप शर्मा आणि दया नायक सोबतच त्यांच्या नावावर 63 एन्काऊंटर ची नोंद होती. मनोरंजक गोष्ट म्हणजे "अब तक 56" हा नाना पाटेकर यांच्या चित्रपट प्रदीप शर्मा यांच्यावर आधारित आहे.  

तर हे कसे काय होऊ शकते? की एक निलंबित अधिकारी जो एक वर्ष आधी परत पोलीस दलात भरती होतो आणि इतका शक्तीशाली कसा होऊ शकतो? वाजे यांच्या राजनैतिक संबंधांमुळे ते मुंबईच्या कमिशनर नंतर मुंबई पोलीस मधील दुसरे प्रभावशाली अधिकारी होते. ते कथीतरीत्या क्राईम ब्रांच च्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला ठेवत सरळ पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. असे म्हणले जाते की रोज ते त्यांच्यासोबत चहा देखील प्यायचे.  

मुंबई पोलिसांच्या बदनामी नंतर NIA ने अंबानी स्फोटक प्रकरण हाती घेतले. ATS प्रमुखांनी हिरेन यांच्या हत्येचा तपास सुरू केला. लवकरच 4 विदेशी गाड्या शोधून काढण्यात आल्या, ज्या वाजे नेहमी वापरायचे. त्यातील एक मर्सडीज ML250 जवळच सार्वजनिक पार्किंगमध्ये उभी मिळाली. त्यामध्ये 5 लाख रोख आणि एक नोट मोजायची मशीन देखील सापडली. नंतर समजले की वाजे यांनी सुदेश खामकर नावाने 100 दिवस स्वतःसाठी एक सूट बुक केला होता. बहुदा अशी एक व्यक्ती ज्याच्यावर त्यांची पकड असेल. हे देखील समोर आले की त्यांनी मुंबई पोलिसांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी BARC अधिकारी वर्गाकडून 30 लाख रुपये देखील घेतले होते.  

5 दिवसानंतर NIA ने वाजे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनूरे यांची जवळपास 13 तास विचारपूस केली. वाजे यांनी सुरुवातीला तोंड उघडले नाही, त्यांनी फक्त इतका आरोप केला की त्यांच्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट मित्र प्रदीप शर्माने त्या जिलेटीन च्या कांड्या विकत घेतल्या होत्या. CCTV फुटेज नुसार डेटा डंप आणि DVR ला नष्ट करण्यासाठी त्यांच्या जवळचे पोलीस इन्स्पेक्टर रियाज काझी यांना म्हटले की डु इट! पण ते अयशस्वी ठरले.

मुंबईच्या मिठी नदीतून शव मिळाले व सोबतच मिळाली औरंगाबाद मधून एक महिन्याच्या आधी चोरी गेलेल्या मारुती इकोव्हॅन ची नंबर प्लेट! ज्या व्हॅन मध्ये दोन मृत दहशतवाद्यांना टाकून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना या पूर्ण योजनेसाठी दोषी ठरवण्यात येणार होते. वाजे यांचा काय हेतू आहे हे स्पष्ट नाही मात्र असे वाटते आहे की त्यांनी पोलीस दलात आपली जागा सिद्ध करून अधिकृत रित्या उच्च पदावर रुजू होण्यासाठी ही योजना आखली होती.  

जशाप्रकारे हिरेन यांचा वापर करून त्यांचा काटा काढण्यात आला, त्याचप्रमाणे वाजे यांना वाटत आहे की ते एक अडचण आहेत. त्यांच्या व्हाट्सअप्प स्टेट्स नुसार, "मला असे वाटते आहे की जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे." NIA द्वारे अटक करण्यात आलेल्या पाच व्यक्ती, त्यापैकी 3 सेवेत असलेले पोलीस आहेत. सुनील माने, सचिन वाजे, रियाजुद्दीन काजी, विनायक शिंदे हे सर्व पोलीस तर नरेष गौर हा बुकीं आहे. आपली प्रतिमा स्वच्छ रहावी म्हणून परमविर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवून होमगार्ड मध्ये पाठविण्यात आले. ह्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला. यात ते म्हणतात की त्यांनी मला आणि वाजे सारख्या पोलिसांना रेस्टॉरंट आणि बार कडून दर महिन्याला 100 कोटींची वसुली करायला सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या कोठडीतून लवकरच अजून काही गुपिते समोर आली. जेव्हा राज्य इंटेलिजन्स च्या रश्मी शुक्ला यांनी कॅश फॉर पोस्टिंग वर आधारित एक फोन रेकॉर्डिंग सादर केली. यानुसार महाविकास आघाडीचे काही मंत्री हे पोलीस अधिकाऱ्यांना चांगली पोस्टिंग अथवा बदली देण्यासाठी पैसे घेतात असा आरोप करण्यात आला. आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे तीन  पक्षांचे हे सरकार टिकून आहे.  

परंतु राजकारणात काहीही होऊ शकते. सरकार टिकेल, पडेल आणि वेळ आली तर वाजे यांची सुटका देखील होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने